नागपूर जिल्ह्याची ओळख
नागपूर ज्याला “संत्र्यांची नगरी” ही म्हटले जाते. ही महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आहे.कारण येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते. १८ व्या शतकाच्या सुरुवातीस गोंड राजकुमार भक्त बुलंद यांनी या शहराची स्थापना केली. विदर्भाची राजकीय आणि व्यापारी केंद्रबिंदू म्हणून नागपूरची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारताच्या भौगोलिक मध्यबिंदूवर वसलेले हे शहर प्रसिद्ध “झिरो माईल मार्कर” साठी ओळखले जाते.
नागपूर जिल्हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. सोयाबीन,ज्वारी आणि खनिज संपत्ती यासह येथे भाजीपाला आणि गवताचे सर्वाधिक उत्पादन होते. नागपूर शहराचे नाव नाग नदीवरून पडले आहे. ही नदी नागासारख्या वळणदार प्रवाहात वाहते. नागपूर जिल्हा नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे.
वनसंपत्ती आणि समृद्ध जैवविविधतेमुळे नागपूरला “भारताची वाघांची राजधानी” असेही संबोधले जाते. वनप्रेमींसाठी हा जिल्हा निसर्ग संपत्तीचा खजिना आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशाच्या सीमेलगत वसलेले “पेंच राष्ट्रीय उद्यान” वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणी आहे. येथे वाघ, बिबटे तसेच असंख्य प्रकारचे पक्षी आणि वनस्पतींची विपुलता आढळते. जंगल सफारीच्या रोमांचक अनुभवासाठी हे उद्यान पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
नागपूरचा समृद्ध इतिहास
नागपूरचा इतिहास तीन हजार वर्षांहून अधिक प्राचीन आहे आणि तो विविध संस्कृतींनी समृद्ध केला आहे. इ.स.पूर्व ८ व्या शतकापासून येथे मानवी वस्ती असल्याचे पुरावे आढळतात. द्रुगधामना येथे आढळलेल्या मेगालिथिक समाधीस्थळांमुळे येथे पूर्वीपासूनच विकसित संस्कृती अस्तित्वात असल्याचे स्पष्ट होते. तसेच १० व्या शतकातील शिलालेखात “नागपूर-नंदिवर्धन” असा उल्लेख सापडतो जो या भागाच्या प्राचीन वारशाची साक्ष देतो.
गोंड राजवटीने नागपूरची स्थापना केली परंतु भोसले घराण्याच्या नेतृत्वाखाली हे शहर मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा भाग बनले आणि राजकीय दृष्टिकोनातून अधिक बळकट झाले.
१८१७ च्या सिताबर्डीच्या लढाईनंतर नागपूरच्या इतिहासाला एक वेगळे वळण मिळाले. या लढाईत भोसले राजवटीचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नागपूरचा ताबा घेतला. त्यानंतर नागपूर सेंट्रल प्रोव्हियन्सेस आणि बरारच्या राजधानीचे स्थान झाले. ब्रिटिश राजवटीत बरीच औद्योगिक प्रगतीही घडून आली. १८७७ मध्ये टाटा समूहाने “एम्प्रेस मिल्स” सुरू केली जी भारताच्या औद्योगिक विकासाचे प्रतीक ठरली.
भारतीय स्वातंत्र्यानंतर नागपूरने आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली. सुरुवातीला नागपूर मध्य प्रदेशाचा भाग होता त्यानंतर ते बॉम्बे राज्यात समाविष्ट झाले आणि अखेरीस महाराष्ट्रात विलीन झाले. नागपूर करारामुळे हे शहर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी म्हणून मान्यता प्राप्त झाले.
नागपूरच्या आधुनिक ओळखीशी दलित बौद्ध चळवळीचा विशेष संबंध आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये याच शहरात बौद्ध धर्माचीची दीक्षा घेतली आणि त्यामुळे भारतातील वंचित समाजाच्या उद्धारासाठी एका नव्या युगाची सुरुवात झाली. नागपूरचे महत्त्व अधोरेखित करणारे “झिरो माईल मार्कर” हे शहराच्या भौगोलिक आणि ऐतिहासिक केंद्रबिंदूचे प्रतीक आहे. ब्रिटिश काळात उभारलेला हा मार्कर भारताच्या मध्यबिंदूचे प्रतिनिधित्व करतो.
प्राचीन वारसा, औद्योगिक आणि राजकीय विकास तसेच सामाजिक चळवळींचे केंद्र असलेले नागपूर आजही भारताच्या संस्कृती, अर्थव्यवस्था आणि राजकारणावर प्रभाव टाकणारे महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते.
नागपूरमधील पर्यटन स्थळे
- धार्मिक स्थळे
१. ड्रॅगन पॅलेस बौद्ध मंदिर: हे कंठी येथे वसलेले आहे. हे नागपूरचे ‘कमळ मंदिर’ म्हणून ओळखले जाते. १९९९ मध्ये जपानच्या ओगावा सोसायटीच्या मदतीने हे सुंदर मंदिर उभारण्यात आले. येथे अत्यंत भव्य चंदनाच्या लाकडाची बुद्ध मूर्ती आहे जी पर्यटक आणि श्रद्धाळूंच्या आकर्षणाचे केंद्र आहे. सुंदर बागांनी नटलेले हे शांत मंदिर प्रत्येकाला आध्यात्मिक शांती आणि समाधानाचा अनुभव देणारे ठिकाण आहे.
२. अक्षरधाम मंदिर: हे नागपूरमधील नवीन आणि भव्य वास्तूंपैकी एक आहे. या मंदिराच्या भव्य रचनेसोबतच येथे रेस्टॉरंट, मुलांसाठी खेळण्याची जागा आणि प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध आहे.संध्याकाळी या मंदिरातील प्रकाशयोजना आणि सजावट अद्भुत दिसते. त्यामुळे ते धार्मिक तसेच स्थापत्यशास्त्राच्या प्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरते. - किल्ले
१. रामटेक किल्ला आणि मंदिर: डोंगराच्या शिखरावर वसलेले रामटेक किल्ला आणि मंदिर धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. रामायणानुसार प्रभु श्रीरामाने लंकेच्या विजयासाठी प्रस्थान करण्यापूर्वी येथे विश्रांती घेतली होती. हे मंदिर केवळ भक्तांसाठीच नव्हे तर इतिहासप्रेमींसाठीही एक विशेष आकर्षण आहे. याच्या प्राचीन वास्तुशैलीसोबतच शांत आणि आध्यात्मिक वातावरण या मंदिराला एक अद्वितीय महत्त्व प्रदान करते..
२. सिताबर्डी किल्ला: १८१७ मध्ये झालेल्या सिताबर्डीच्या लढाईचा साक्षीदार असलेला हा किल्ला नागपूरच्या ऐतिहासिक वारशाचा अविभाज्य भाग आहे. विशेष म्हणजे याच किल्ल्यात महात्मा गांधी यांना काही काळ तुरुंगात ठेवण्यात आले होते. सैन्याच्या इतिहासासोबतच ब्रिटिशकालीन आठवणींनी नटलेला हा किल्ला इतिहासप्रेमी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी जपणाऱ्या पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे स्थळ आहे. - स्मारके
१. दीक्षाभूमी: हे बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. इथे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या वास्तूची शांत आणि भव्य रचना तसेच याठिकाणी असलेली आध्यात्मिक ऊर्जा यामुळे हे प्रत्येक श्रद्धाळू आणि पर्यटकाने आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे.
२. झिरो माईल मार्कर: ब्रिटिश काळात ग्रेट ट्रायँग्युलेशन सर्व्हे ऑफ इंडिया दरम्यान बांधले गेलेले झिरो माईल मार्कर नागपूरला भारताच्या भौगोलिक मध्यबिंदूचे प्रतिक मानले जाते. जरी याचे खरे स्थान अजूनही चर्चेचा विषय असले तरी इतिहासप्रेमींसाठी हे एक आकर्षक स्मारक आहे. - नॅशनल पार्क्स
नागपूरच्या आसपास अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे तुम्ही रस्त्याने सहज पोहोचू शकता.
१. पेंच राष्ट्रीय उद्यान: हे वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणी आहे. येथे वाघ, बिबटे, लांडगे, गवे, हरणे, मोर आणि अनेक प्रकारचे प्राणी पाहायला मिळतात. हे राष्ट्रीय उद्यान रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’ मधील प्रसिद्ध पात्र मोगली आणि शेर खानशी निगडित आहे. पेंच नदीच्या काठावर वसलेले हे उद्यान १९८३ मध्ये अधिकृतपणे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
२. नवेगाव राष्ट्रीय उद्यान: हे वन्यजीव प्रेमी आणि साहसप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे समृद्ध वनस्पती आणि प्राणीजीवन पाहायला मिळते. नवेगाव धरणावर बोट राईड आणि जंगल सफारी यांचा आनंद घेता येतो. निसर्ग आणि साहस अनुभवायचे असल्यास हे ठिकाण एकदम योग्य पर्याय आहे. - निसर्गरम्य स्थळे
१. अंबाझरी तलाव: नागपूरमधील ११ तलावांपैकी सर्वात मोठा अंबाझरी तलाव आहे. या तलावाच्या सभोवताल असलेल्या दाट आंब्याच्या बागांमुळे याला ‘अंबाझरी’ असे नाव पडले. येथे बोटिंगसारख्या मनोरंजनात्मक सुविधा उपलब्ध असून निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. कुटुंबासोबत सहलीसाठी तसेच शांत विश्रांतीसाठी हे एक सुंदर ठिकाण आहे.
२. अंबा खोरी: पेंच नदीच्या जवळ वसलेले अंबा खोरी हे मनमोहक धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील टोटलाडोह धरणाचे देखणे दृश्य आणि धबधब्याचा नजारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा अनुभव देतो. निसर्गप्रेमी आणि शांततेचा शोध घेणाऱ्या पर्यटकांसाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे. येथे धबधब्याच्या आवाजासोबत निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद घेता येतो.
३. वाकी वुड्स: निसर्ग सौंदर्य आणि आधुनिक सुविधांचा अद्वितीय संगम असलेले वाकी वुड्स पर्यटकांसाठी एक खास अनुभव देणारे ठिकाण आहे. येथे विद्युत आणि दूरसंचार सुविधांनी युक्त सुसज्ज तंबू उपलब्ध आहेत, त्यामुळे शहरी सोयींसह कँपिंगचा रोमांचक आनंद घेता येतो. याशिवाय ट्रेकिंग, बोटिंग आणि धनुर्विद्येसारख्या साहसी खेळांचा अनुभव घेण्याची संधी येथे मिळते ज्यामुळे हे साहसप्रेमींसाठी खास ठिकाण ठरते.
भेट देण्यासाठी उत्तम काळ
| हंगाम / महिने | हवामान परिस्थिती | पर्यटनासाठी उपयुक्त माहिती |
| ऑक्टोबर – फेब्रुवारी | थंड आणि आल्हाददायक | सर्वोत्तम; पर्यटन आणि बाहेरच्या उपक्रमांसाठी आदर्श. |
| जुलै – सप्टेंबर | मध्यम ते जोरदार पाऊस | मध्यम; पाऊस पर्यटनात अडथळा आणू शकतो, पण निसर्ग हिरवागार दिसतो. |
| उन्हाळा (मार्च – जून) | उष्ण आणि दमट | तीव्र उष्णतेमुळे प्रवास त्रासदायक होऊ शकतो. |
नागपूर जिल्हा तुमच्या प्रवासाच्या यादीत का असावा?
संत्र्यांची नगरी नागपूर ही इतिहास, संस्कृती आणि निसर्ग यांचा परिपूर्ण संगम असलेली एक अनोखी पर्यटनस्थळ आहे. महाराष्ट्राची हिवाळी राजधानी आणि विदर्भाच्या हृदयस्थानी असलेले नागपूर राजकीय तसेच व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण शहर आहे. याचा तीन हजार वर्षांचा समृद्ध इतिहास गोंड राजांच्या काळापासून सुरू होऊन मराठा साम्राज्याच्या आणि नंतर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. सिताबर्डी किल्ला आणि झिरो माईल मार्कर ही नागपूरच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्त्वाची साक्ष देणारी प्रमुख स्थळे आहेत.
निसर्गप्रेमींसाठी नागपूर स्वर्गासमान आहे. पेंच आणि नवेगाव सारखी व्याघ्र अभयारण्ये रोमांचक सफारी आणि जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहेत. अंबाझरी तलाव आणि अंबा खोरी धबधबा निसर्गाच्या सान्निध्यात शांतता शोधणाऱ्यांसाठी आदर्श आहेत तर वाकी वुड्स साहसी पर्यटकांना एक वेगळा अनुभव देते.
इतिहास, आध्यात्मिकता आणि निसर्गाचा अनोखा संगम असलेले नागपूर प्रत्येक प्रवाशासाठी काही ना काही खास अनुभव घेऊन येते. त्यामुळेच तुमच्या प्रवासाच्या यादीत नागपूरने नक्कीच स्थान मिळवायला हवे!
प्रवासासाठी आवश्यक गोष्टी
प्रवासासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती येथे दिली आहे.
प्रमुख आकर्षणे
आमच्या खास निवडक अनुभवांद्वारे महाराष्ट्राचे सौंदर्य आणि संस्कृती जाणून घ्या.

तोटलाडोह
तोटलाडोह धरण हे नागपूर जिल्ह्यातील रामटेकजवळ पेंच नदीवर बांधलेले 'ग्रॅव्हिटी डॅम' (गुरुत्वीय धरण) आहे.

खिंडसी तलाव
सर्व बाजूंनी हिरव्यागार जंगलांनी वेढलेले 'खिंडसी' हे निसर्गरम्य आणि विशाल सरोवर रामटेकपासून सुमारे ३.५ किमी आणि नागपूरपासून ५३ किमी अंतरावर स्थित आहे.

खेकरनाला तलाव
नागपूरच्या उत्तरेस ६५ किमी अंतरावर खापा रेंजमध्ये असलेले 'खेक्रनाला' हे एक सुंदर धरण स्थळ आहे.

सातपुडा वनस्पति उद्यान
फुटाळा तलावाजवळ सेमिनरी हिल्सवर स्थित असलेले 'सातपुडा बोटॅनिकल गार्डन' हे एक अतिशय सुंदर उद्यान आहे.

सातपुडा वनस्पति उद्यान
फुटाळा तलावाजवळ सेमिनरी हिल्सवर स्थित असलेले 'सातपुडा बोटॅनिकल गार्डन' हे एक अतिशय सुंदर उद्यान आहे.

सक्करदरा लेक गार्डन
आळस झटकून निवांत विश्रांती घेण्यासोबतच निसर्गाच्या किमयेचा आनंद घेण्यासाठी जर एखाद्या ठिकाणाचा शोध घ्यायचा असेल...

