मुंबई उपनगर जिल्ह्याची ओळख
मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात स्थित असून तो मुंबई महानगर क्षेत्राचा एक अविभाज्य भाग आहे. हा जिल्हा मुंबईच्या आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनावर मोठा प्रभाव टाकतो. आधुनिकतेचा आणि परंपरेचा सुंदर संगम असलेला हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. गगनचुंबी इमारती, विस्तीर्ण मॉल्स, प्रसिद्ध समुद्रकिनारे आणि गर्दीने भरलेल्या रस्त्यांमुळे या जिल्ह्याचे वेगळेच महत्व आहे.
मुंबई उपनगर हा मुंबईतील सर्वात वर्दळीचा आणि गतिशील भाग आहे. याचे प्रमुख विभाजन पश्चिम, मध्य आणि हार्बर या तीन रेल्वे मार्गांवर होते. १९५० मध्ये हा स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. अंधेरी, बांद्रा, खार, सांताक्रूझ, मालाड, गोरेगाव, कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, विक्रोळी आणि बोरिवली यांसारखी अनेक महत्त्वाची उपनगरे यामध्ये समाविष्ट आहेत.
या विस्तीर्ण शहरी भागात भारताच्या आर्थिक आणि मनोरंजन क्षेत्राचे मुख्य केंद्र आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याने देशाच्या आर्थिक वाढीत मोठे योगदान दिले आहे आणि त्यामुळेच तो संपूर्ण भारतासाठी एक महत्त्वाचा जिल्हा आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचा इतिहास
इतिहास पाहता मुंबई उपनगर जिल्ह्याची स्थापना १९४० मध्ये झाली. मात्र १९५० मध्ये हा भाग बॉम्बे शहरात समाविष्ट करून ग्रेटर बॉम्बे महानगरपालिकेचा (Greater Bombay Municipal Corporation) भाग बनवण्यात आला. पुढे १९९० मध्ये या भागाचे पुन्हा विभाजन झाले आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर असे दोन वेगवेगळे जिल्हे निर्माण केले.
१९९६ मध्ये या जिल्ह्याचे नाव अधिकृतपणे मुंबई उपनगर जिल्हा असे ठेवण्यात आले. सध्या हा जिल्हा अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या तीन तालुक्यांमध्ये विभागलेला आहे. मुंबईच्या प्रशासकीय व्यवस्थेत हा जिल्हा महत्त्वाची भूमिका बजावतो. मुंबईच्या सतत विकसित होणाऱ्या शहरी रचनेचे प्रतिबिंब या जिल्ह्यात स्पष्टपणे दिसून येते आणि हेच या महानगराच्या वाढीचे एक प्रमुख लक्षण आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
- नॅशनल पार्क्स
१. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान: मुंबईसारख्या प्रचंड गजबजलेल्या शहरात फक्त दीड तासाच्या अंतरावर १०४ चौरस कि.मी.व्यापलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच आहे. येथे दुर्मिळ वनस्पती, हजारो पक्ष्यांच्या प्रजाती, रंगीबेरंगी फुलपाखरे आणि क्वचितच दिसणारे बिबटेही आढळतात. मुंबईच्या उत्तरेला वसलेले हे जंगल शहराच्या प्रदूषणापासून आणि सततच्या शहरीकरणाच्या धोका टाळण्यासाठी एक नैसर्गिक तटबंदी म्हणून काम करते. त्यामुळे उद्यानाचा मुख्य भाग अद्यापही शांत आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. - लेण्या
१. कण्हेरी लेण्या: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत वसलेल्या कान्हेरी लेण्या या मुंबईतील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बौद्ध गुहा आहेत. इथं तब्बल १०९ गुहा असून त्या एक ते दहाव्या शतकाच्या दरम्यान कोरल्या गेल्या आहेत .या गुहा बौद्ध धर्माच्या तिन्ही शाखांचे प्रतिनिधित्व करतात. विशेषतः महायान आणि वज्रयान परंपरेचा ठसा यामध्ये दिसतो. ८ व्या आणि ९ व्या शतकात हे ठिकाण बौद्ध शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र होते. तत्कालीन विख्यात विचारवंत राहुलगुप्तवज्र आणि आर्य अतीश दिपंकर यांनी येथे शिक्षण घेतले होते. इथले मुख्य आकर्षण म्हणजे भव्य सभागृह, स्तूप, बोधिसत्व शिल्पे आणि अत्यंत विकसित जलव्यवस्थेचे अवशेष! संस्कृतमध्ये या ठिकाणाला “कृष्णगिरी” (काळा पर्वत) असेही म्हटले जाते.
२. कोंडिवटे (महाकाली) लेण्या: अंधेरी पूर्व भागात असलेल्या कोंडिवटे लेण्या ज्याला महाकाली लेण्या असेही म्हटले जाते, या पहिल्या शतकातील बौद्ध लेणी आहेत. कन्हेरी गुहांच्या तुलनेत आकाराने लहान आणि कमी प्रसिद्ध असल्या तरी त्या बौद्ध धर्माच्या प्रारंभीच्या वास्तुशैलीचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहेत. काळानुसार आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक मूर्ती आणि चित्रे नष्ट झाली आहेत तरीसुद्धा हे ठिकाण ऐतिहासिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. - समुद्रकिनारे
१. जुहू बीच: मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि लांबलचक किनाऱ्यांपैकी एक जुहू बीच! मुंबईतील सेलिब्रिटी आणि चित्रपटसृष्टीतील लोकांसाठी अत्यंत लोकप्रिय आहे. इथे फिरायला येणाऱ्या पर्यटकांना पाणीपुरी, भेळपुरी आणि पावभाजी यासारख्या चवदार स्ट्रीट फूडची मेजवानी मिळते. या व्यतिरिक्त जुहू बीचवर घोडेस्वारी, विविध खेळ आणि मनमोहक सूर्योस्त अनुभवण्याची संधीही मिळते. समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला अनेक लोकप्रिय कॅफे आणि रेस्टॉरंट्स आहेत ज्यामुळे हा परिसर तरुणाईसाठी हँगआउट स्पॉट म्हणून प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध स्ट्रीट फूड : मुंबईची खाद्यसंस्कृती
मुंबईच्या चविष्ट स्ट्रीट फूडची मजा घ्यायची असेल तर इथल्या सुप्रसिद्ध पदार्थांचा आस्वाद घेतलाच पाहिजे. वडापाव हा मुंबईकरांचा आवडता झटपट खाऊ ज्यामध्ये मऊ ब्रेडमध्ये झणझणीत बटाट्याचा वडा असतो. याशिवाय पावभाजी हा बटरमध्ये परतलेला मऊ पाव आणि चटकदार भाज्यांची चविष्ट भाजी खवय्यांना विशेष आवडते.
सीफूड प्रेमींसाठी बोंबील फ्राय हा कोळी समाजाचा खास पदार्थ आहे. ही खमंग तळलेली बॉम्बे डक मासळी अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असते.
हलक्या आणि चटपटीत पदार्थांची मजा घ्यायची असेल तर भेळपुरी, पाणीपुरी आणि शेवपुरी हा उत्तम पर्याय आहे. भेळपुरी ही चुरमुरे ,शेव, कांदा, टोमॅटो, आणि चटणी यांचे चटकदार मिश्रण असते. शेवपुरी मध्ये कुरकुरीत पुरीवर मस्त मसालेदार मिश्रण असते. हे सर्व पदार्थ समुद्रकिनाऱ्यावर फिरताना खाण्याची मजा काही वेगळीच असते. - अन्य आकर्षणे
१. बांद्रा-वरळी सी लिंक: मुंबईच्या आधुनिकतेचे प्रतीक असलेला बांद्रा-वरळी सी लिंक हा एक अद्भुत इंजिनीअरिंगचा नमुना आहे. या भव्य पूलामुळे बांद्रा आणि वरळी हे जोडले गेले असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. अरबी समुद्राच्या लाटा, पुलाचा आकर्षक लुक आणि रात्रीचा प्रकाशमय नजारा हे या पुलाचे वैशिष्ट्य आहे.
२. फिल्म सिटी: गोरेगावमध्ये वसलेली फिल्म सिटी हे बॉलीवूडच्या जडणघडणीचे महत्त्वाचे स्थान आहे. याची स्थापना दादासाहेब फाळके यांनी केली होती आणि पुढे व्ही. शांताराम यांच्या पाठिंब्याने ही विस्तारित झाली . येथे तयार केलेले कृत्रिम सेट्स, जसे की पर्वत, तलाव, खेडी आणि गजबजलेली शहरे, हे खऱ्या लोकेशन्स इतकीच प्रभावी वाटतात. महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली येथे विविध बॉलीवूड टूर आयोजित केल्या जातात. पर्यटकांना येथे चित्रपटाच्या सेटवर फिरण्याची, डबिंग प्रक्रिया पाहण्याची आणि लाईट-साउंड इफेक्ट्सचा अनुभव घेण्याची संधी मिळते.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ऐतिहासिक वारसा, धार्मिक परंपरा, निसर्गसंपत्ती आणि आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख मिलाफ दर्शवते. स्ट्रीट फूड असो, प्राचीन गुहांमधील इतिहास असो ,समुद्रकिनाऱ्यावर निवांत वेळ घालवायचा असो किंवा फिल्म सिटी आणि आधुनिक बांधकामांची भव्यता अनुभवायची असो मुंबई उपनगर तुमच्यासाठी एक परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे!
मुंबई उपनगर जिल्हा भेट देण्यासाठी उत्तम काळ
हंगाम | सर्वोत्तम गोष्टी | प्रवासासाठी टिप्स |
ऑक्टोबर ते फेब्रुवारी | पर्यटनस्थळे पाहणे, ऐतिहासिक ठिकाणांची सैर | थंड व आल्हाददायक हवामानामुळे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ. |
जून ते सप्टेंबर | ट्रेकिंग, निसर्गाचा आनंद, धबधबे पाहणे | निसर्गप्रेमींसाठी उत्तम; मात्र, जोरदार पावसासाठी तयारी आवश्यक. |
मार्च ते मे | उन्हामुळे बाहेरची ठिकाणे मर्यादित प्रमाणात पाहता येतात | अतिशय उष्ण आणि दमट हवामानामुळे भेट देण्यासाठी योग्य नाही. |
मुंबई उपनगर जिल्ह्याला का भेट द्यावी?
मुंबई उपनगर जिल्हा हा प्रत्येक प्रवाशाच्या यादीत असायलाच हवा, कारण येथे इतिहास, संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम पाहायला मिळतो.
- आधुनिक चमत्कार: बांद्रा -वर्ली सी लिंक हा एक अभियांत्रिकी अद्भुत नमुना आहे, जो मुंबईच्या द्रुतगती वाहतुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो.
- प्रसिद्ध समुद्रकिनारे: जूहू बीच हे केवळ सुंदर सूर्यास्तासाठीच नव्हे, तर प्रसिद्ध वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी यांसारख्या स्वादिष्ट स्ट्रीट फूडसाठीही ओळखले जाते.
- इतिहासप्रेमींसाठी ठिकाणे: कन्हेरी लेण्या आणि महाकाली लेण्या या प्राचीन बौद्ध इतिहासाची साक्ष देतात आणि प्राचीन वास्तुकलेची झलक दाखवतात.
- निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग: संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे, जिथे हिरवाई, दुर्मिळ पक्षी, फुलपाखरे आणि क्वचितच आढळणारे बिबटेही पाहायला मिळतात.
- बॉलीवूडचा जादुई अनुभव: मुंबई उपनगर जिल्हा म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र. गोरेगाव येथील फिल्मसिटीमधील विविध सेट्स, डबिंग स्टुडिओज आणि लाईट अँड साउंड टूर पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव देतात.
इतिहास, निसर्ग आणि सिनेसृष्टीचा अनोखा मिलाफ पाहायचा असेल तर मुंबई उपनगर जिल्हा तुमच्या प्रवास यादीत असायलाच हवा!
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Juhu Beach
Juhu Beach is one of the longest beaches in Mumbai. Visit this beach to enjoy the crimson sun and the dazzling orange sky with your loved ones on a windy day. Juhu Beach is frequently visited by couples seeking a romantic break from the hustle and bustle of city life.

Mumbai Film City
A trip to Mumbai is incomplete without experiencing the magic of Bollywood! The Dadasaheb Phalke Chitranagari, popularly known as Mumbai Film City, is a world of wonders spanning ~100,000 square feet over theatres, gardens, lakes, recording rooms, etc., leased out for Bollywood film shootings.

Water Kingdom
The Water Kingdom is one of the most popular tourist spots in Mumbai. It is spread over 22 acres and together with Essel World nearby, this water-themed amusement park is the choicest destination for fun and relaxation during Mumbai tour. Water Kingdom of Mumbai has over 30 water activities

Mahakali Caves
These caves have been carved in a small hill at a distance of 6 kms from the andheri railway station on the western railway.The sanctuary must have been a major religious centre during the Buddha period.The cave comprises of 19 viharas. A sculpture of shivalangam has ben installed by shiva followers later on.

Kanheri Caves
Way to these ancient caves pave through the Sanjay Gandhi National Park,situated in the hills on the vast land of this udyan, the caves are an excellent work of architecture. According to the historians the caves were carved between 200 D.C. and 600 A.D. Few sculptures excavated in these caves are amazing.

Chhota Kashmir
It is a colourful garden developed in the Aarey colony area just near the Aarey Diary. The garden is full of variety of colourful flowers, which blossom in all seasons round the the year. The ever green lawns of the garden , the tall coconut trees and the beautiful palm trees grown here simply remind us of natural beauty of Kashmir. This may perhaps be the reason of calling this garden as ‘Chhota Kashmir’.

Sanjay Gandhi National Park
Popularly known as “Krishnagiri Upvan” or “Borivali National Park”,National park is spread over a very vast area of about 104 sq. Km. It is at a distance of 1 km from the Borivali Railway station on Western Railway. The Western Express Highway is quite near from the main gate of the park.