नंदुरबार जिल्ह्याची ओळख

महाराष्ट्राच्या खानदेश भागातील नंदुरबार जिल्हा १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून विभाजित होऊन स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. महाराष्ट्राच्या वायव्य भागात वसलेला हा जिल्हा उत्तरेला नर्मदा नदीच्या सीमेलगत आहे. जी त्याला मध्य प्रदेशपासून वेगळे करते.

नंदुरबार हा जिल्हा मुख्यतः आपल्या आदिवासी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे भिल्ल आणि पावरा समाजाच्या मोठ्या प्रमाणात वस्त्या असल्यामुळे या भागाची संस्कृती समृद्ध आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. कापूस, बाजरी आणि शेंगदाणे ही येथे मोठ्या प्रमाणावर घेतली जाणारी प्रमुख पिके आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांसोबत वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत.ज्यामुळे उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात नंदुरबारचा महत्त्वाचा वाटा होता. १९४२ मधील ‘भारत छोडो’ आंदोलनात या भागाने मोठी भूमिका बजावली होती. पर्यटनाच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले तोरणमाळ हे नयनरम्य हिल स्टेशन तसेच उनापदेव येथील गरम पाण्याचे झरे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरतात. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेल्या आपल्या भौगोलिक स्थानामुळे नंदुरबार जिल्ह्यात सांस्कृतिक आणि आर्थिक देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे येथे परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो.

नंदुरबारचा इतिहास

प्राचीन काळात नंदुरबारला राजा नंदराजाच्या नावावरून “नंदनगिरी” तसेच “रसिका” असेही ओळखले जात असे. यादव राजवंशाच्या सेऊनचंद्रराजाच्या काळात या प्रदेशाला “सेऊनदेश” असे म्हटले जात असे. पुढे हा भाग फारूकी राजघराण्याच्या काळात खानदेशचा भाग बनला. नंदुरबार अनेक ऐतिहासिक राजवटींचा साक्षीदार राहिला आहे. मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य यांसारख्या अनेक साम्राज्यांनी येथे राज्य केले. बेहरार, नेमाड आणि औरंगाबाद या महत्त्वाच्या प्रदेशांच्या सीमेवर असल्यामुळे नंदुरबारचा भारताच्या इतिहासात महत्त्वाचा वाटा राहिला आहे.

यादव साम्राज्याचा अंत १३१८ मध्ये दिल्ली सल्तनतच्या आक्रमणाने झाला आणि त्यानंतर बहमनी व फारूकी राजवंशांनी येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. पुढे मुघल सम्राट अकबराने खानदेश जिंकून त्याचा मुलगा दनियाल याच्या सन्मानार्थ नंदुरबारचे नाव “दानदेश” असे ठेवले. मुघल साम्राज्याच्या पतनानंतर मराठ्यांनी या प्रदेशावर ताबा मिळवला. मात्र १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा भाग काबीज केला.भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही नंदुरबारने मोलाचा वाटा उचलला. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात १५ वर्षीय शिरीषकुमार मेहता हुतात्मा झाले. ही घटना स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत महत्त्वाची ठरली.

१ जुलै १९९८ रोजी नंदुरबार स्वतंत्र जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. आजच्या घडीला हा जिल्हा आपल्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगून सांस्कृतिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून विकसित होत आहे.

नंदुरबारमधील प्रमुख पर्यटनस्थळे

  • धार्मिक स्थळे
    १. अस्थांबा: अक्राणी तालुक्यातील अस्थांबा हे नंदुरबारमधील एक पवित्र तीर्थस्थान आहे. विशेषतः येथे दरवर्षी भरणारा अस्थांबा उत्सव हा दक्षिण गुजरात आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आदिवासी मेळाव्यांपैकी एक मानला जातो. दिवाळीच्या काळात १० ते १५ दिवस चालणाऱ्या या उत्सवात हजारो भाविक सहभागी होतात. या ठिकाणाचा महाभारतातील अश्वत्थामाशी संबंध असल्याचे मानले जाते. आदिवासी समाज अश्वत्थामाला गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र मानले जाते त्यामुळे त्या संबंधित श्रद्धा येथे पाहायला मिळते.
    २. प्रकाशा: शहाडा तालुक्यातील प्रकाशा हे ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. तापी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या या गावात अनेक प्राचीन मंदिरे असून येथे दूरदूरहून भाविक येतात. संस्कृती आणि निसर्गसौंदर्य यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या ठिकाणी यात्रेकरूंना आध्यात्मिक शांतीसोबतच निसर्गाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभवही घेता येतो.
    ३. सैय्यद अल्लाऊद्दीन यांची दर्गा (इमाम साहेबांची दर्गा): नंदुरबारमधील एक प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे सैय्यद अल्लाऊद्दीन यांची दर्गा! जी इमाम साहेबांची दर्गा म्हणूनही ओळखली जाते. या स्थळाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या दर्ग्यावरून दिसणारे नंदुरबारचे विहंगम दृश्य पाहणे पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरते.
  • निसर्गरम्य स्थळे
    १. उनापदेव गरम पाण्याचे नैसर्गिक झरे: शहादा तालुक्यातील आडावद गावापासून सुमारे ६ कि.मी. अंतरावर असलेले उनापदेव हे त्याच्या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या झऱ्यांमधून सतत गरम पाणी वाहते आणि विशेष म्हणजे ते गायमुखाच्या आकाराच्या खडकातून बाहेर पडते त्यामुळे या स्थळाला एक अनोखी ओळख मिळते. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेले हे ठिकाण शांत आणि आध्यात्मिक वातावरणाने नटलेले आहे. रामायणात उल्लेख असलेल्या उनापदेव, सुनापदेव आणि निजरदेव या ठिकाणांना पौराणिक महत्त्व आहे आणि असे मानले जाते की प्रभु रामचंद्र आपल्या १४ वर्षांच्या वनवासादरम्यान येथे आले होते.
    २. तोरणमाळ हिल स्टेशन: नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे. जे दाट वनराई, भव्य पर्वतरांगा, मोहक दऱ्या आणि मनमोहक धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील यशवंत तलाव हे सर्वात आकर्षक स्थळांपैकी एक आहे. इथे पर्यटक शांत वातावरणात बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. तसेच सीता-खानी दरी ही येथे एक रहस्यमय स्थळ आहे. जी स्थानिक लोककथांनी व्यापलेली आहे आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते. तोरणमाळचे नैसर्गिक सौंदर्य आणि आल्हाददायक शांतता निसर्गप्रेमींसाठी तसेच मनःशांती शोधणाऱ्या पर्यटकांसाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे.
  • अन्य आकर्षणे
    १. शिरीषकुमार मेहता स्मारक : १९४२ च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान केवळ १५ वर्षांच्या शिरीषकुमार मेहतांनी ब्रिटिश सत्तेविरोधात निदर्शने करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. इंग्रज सैन्याच्या गोळ्यांचा सामना करुन त्यांनी आपल्या जीवाचे बलिदान दिले आणि ते युवा देशभक्तांचे प्रेरक बनले. शिरीषकुमार मेहता स्मारक आजही त्यांच्या वीरतेची आठवण करून देते आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या असंख्य बलिदानांचे स्मरण करून देते.

ही सर्व स्थळे नंदुरबार जिल्ह्याची समृद्ध सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक विविधता दर्शवतात आणि पर्यटकांना या प्रदेशाचा अनोखा वारसा अनुभवण्याची संधी देतात.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

ऋतू कालावधी वैशिष्ट्ये तापमान श्रेणी
उन्हाळा मार्च ते जून मध्य उष्ण व कोरडे; मे महिन्यात तीव्र उन्हाची लाट. अति उष्ण
पावसाळा जून शेवट ते ऑक्टोबर दमट आणि उष्ण; उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील भागात अधिक पाऊस. उष्ण व दमट
हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी सौम्य थंडी आणि कोरडे हवामान; आल्हाददायक वातावरण. थंडसर व कोरडे

नंदुरबार जिल्ह्याला का भेट द्यावी?

महाराष्ट्राच्या खानदेश भागात वसलेले नंदुरबार हे निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध संस्कृतीचा अद्भुत संगम आहे. त्यामुळे पर्यटकांनी एकदा तरी येथे नक्की भेट द्यावी. हा जिल्हा विशेषतः आदिवासी परंपरांसाठी प्रसिद्ध आहे. इथे भील आणि पावरा समाजाच्या चैतन्यशील संस्कृतीने या प्रदेशाला एक वेगळाच आनंददायी रंग दिला आहे. निसर्गाच्या चमत्कारांपासून ते ऐतिहासिक ठेव्यापर्यंत येथे प्रत्येक प्रवाशासाठी काहीतरी खास आहे!

इतिहासप्रेमींसाठी नंदुरबारचे प्रकाशा (दक्षिण काशी) सारखे प्राचीन ठिकाण एक अनमोल ठेवा आहे. तापी नदीच्या काठावर असलेली ही जागा शांततेचा अनुभव देणारी आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची आहे.

तुम्ही अध्यात्म, इतिहास किंवा निसर्गाचा आनंद घेण्यास उत्सुक असाल तर नंदुरबार तुमच्या प्रवासासाठी एकदम योग्य ठिकाण ठरेल!

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

27 - 38°C

Ideal Duration

1 - 2 days

Best Time

November to Febuary

Planning a Trip?

Know how to reach

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Asthamba, Nandurbar

Asthamba is the religious place of Nandurbar region and is located in Akrani Tehsil

Unpdev

The Unapdev hot water springs are located at a distance of 6 km from Adavad village in Shahada taluka .

Toranmal (Hill Station)

A hill station, Yashwant Lake, Sita-Khaani valley, very green natural scenery, mountains, valleys, waterfalls, and numerous earth-massed pylons

Prakasha

A place is located in Shahada taluka of Nandurbar district on the banks of the Tapi River.

Shirish Kumar Smarak

Mahatma Gandhi started the Quit India movement against the British in 1942.

How to Reach

By Air

The nearest airport to Nandurbar is Surat Airport, approximately 140 km away. It connects to major Indian cities, and from there, you can take a taxi or bus to Nandurbar.

By Train

Nandurbar Railway Station is well-connected within the Western Railway network, offering direct trains to Mumbai, Ahmedabad, and other major cities.

By Road

Nandurbar is accessible via National Highway 56. Regular state transport and private buses link Nandurbar with cities like Pune, Mumbai, and Surat.
Scroll to Top