धाराशिव जिल्ह्याची ओळख
धाराशिव जिल्हा जो पूर्वी उस्मानाबाद म्हणून ओळखला जात असे, महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व भागात आहे. हा प्रदेश समृद्ध इतिहास, वैविध्यपूर्ण संस्कृती आणि खडकाळ निसर्गाने भरलेला आहे. तो मराठवाडा विभागात येतो.
जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेत विविधता आहे. बहुतेक भाग डेक्कन ट्रॅपच्या काळ्या बेसॉल्ट खडकांनी बनलेला आहे. मांजरा, भीमा,सीना आणि गोदावरी यांसारख्या मोठ्या नद्यांचे पाणी या भूमीला प्राप्त झालेले आहे.
इतिहासाच्या पाऊलखुणा येथे सर्वत्र दिसून येतात. धाराशिवची प्रसिद्ध लेणी जी प्रथम बौद्ध गुफा होत्या आणि नंतर जैन स्मारकांत रूपांतरित झाल्या हा वारसा जपतात. नळदुर्ग किल्ला मुघल व निजामकालीन महत्त्वाचे वैभव दर्शवतो. त्याचप्रमाणे, तुळजापूरमधील माता तुळजाभवानीचे मंदिर हा श्रद्धेचा प्रमुख केंद्रबिंदू आहे.
धाराशिवमध्ये हिंदू,मुस्लिम आणि जैन समुदाय सलोख्याने राहतात आणि विविध सण व परंपरा मोठ्या उत्साहात साजरे करतात. दुष्काळ, साथीचे रोग आणि १९९३ मधील विनाशकारी किल्लारीचा भूकंप यासारख्या संकटांनंतरही जिल्ह्याने कायमच एकतेची ताकद सिद्ध केली आहे.
आज धाराशिव आपल्या समृद्ध इतिहासाचा, संस्कृतीच्या संगमाचा आणि कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याच्या जिद्दीचा परिचय देतो. त्यामुळे हा महाराष्ट्रातील एक आगळावेगळा आणि तुमच्या पर्यटन अनुभवांसाठी अत्यंत खास असा जिल्हा आहे.
धाराशिवचा समृद्ध इतिहास
पूर्वी उस्मानाबाद म्हणून ओळखला जाणारा धाराशिव हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक जिल्हा आहे. या भूमीवर अनेक राजवटींचे राज्य राहिले. मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट, यादव आणि पुढे बहमनी, विजापूर व मुघल साम्राज्यांचा प्रभाव येथे दिसून येतो. स्वतंत्र भारतात विलीन होण्यापूर्वी हा प्रदेश निजामाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. अखेर १९४८ मध्ये तो भारतात सामील झाला. २०२३ मध्ये प्राचीन धाराशिव लेण्यांपासून प्रेरित होऊन या जिल्ह्याचे नाव बदलून सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख दर्शवणारे “धाराशिव” असे ठेवण्यात आले.
धाराशिवच्या वैभवशाली इतिहासातील सर्वात उल्लेखनीय ठिकाण म्हणजे येथील कोरीव धाराशिव लेण्या! या लेण्या कठीण खडकातून कोरल्या आहेत.या लेण्या तब्बल इ.स.पू. तिसऱ्या शतकातील आहेत. या लेण्यांमध्ये सुरेख कोरीवकाम आणि शिलालेख या प्रदेशातील प्राचीन कलात्मकतेचे दर्शन घडवतात. या पाहताना जणू इतिहासाच्या गूढ प्रवासाला सुरुवात झाल्यासारखे वाटते. त्या काळातील कारागिरांची असामान्य कुशलता आणि निष्ठा यांचा हा एक अप्रतिम पुरावा इथे पाहायला मिळतो.
धाराशिव जिल्ह्यात विविध समुदाय एकत्र राहतात आणि अनेक संस्कृतीचा अनोखा संगम घडवतात. स्थानिक सणांपासून ते पारंपरिक नृत्य व लोकसंगीतापर्यंत धाराशिवची संस्कृती जिवंत आणि उर्जेने भरलेली आहे. या सणांमध्ये स्थानिकांसोबत सहभागी झाल्यास तुम्हाला या जिल्ह्याच्या खरी ओळख आणि याचा रंगतदार असा अविस्मरणीय अनुभव मिळेल.
धाराशिव मधील पर्यटन स्थळे
धाराशिवमध्ये प्रत्येक जिज्ञासू मनासाठी काही ना काही खास आहे. प्राचीन वारसास्थळांपासून निसर्गाच्या अविष्कारांपर्यंत प्रत्येक ठिकाण स्वतःची वेगळी कहाणी सांगते. तुमच्या प्रवासात ही ठिकाणे नक्की पहा:
- धार्मिक स्थळे
१. तुळजाभवानी मंदिर: तुळजापूरमध्ये वसलेले हे पवित्र मंदिर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. हजारो भाविक येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी व आशीर्वाद मिळवण्यासाठी येतात. या ठिकाणाला केवळ धार्मिकच नाही तर ऐतिहासिक महत्त्वही आहे. देवी तुळजाभवानी हि नीतिमत्तेचे रक्षण करणारी आणि भक्तांना दिव्य ज्ञान देणारी संरक्षक देवता मानली जाते.
२. तेर (तगर): धाराशिवपासून सुमारे २२ किमी अंतरावर असलेले तेर (तगर) हे ऐतिहासिक दृष्ट्या एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. तेरणा नदीच्या किनारी वसलेल्या या ठिकाणी अनेक प्राचीन मंदिरे आढळतात. संत गोरोबा कुंभार यांच्या वास्तव्यामुळे आणि श्री नृसिंह मंदिरासारख्या श्रद्धास्थानांमुळे या गावाला सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. - किल्ले
१. नळदुर्ग किल्ला: धाराशीवच्या अग्नेय दिशेला सुमारे ५० किमी अंतरावर नळदुर्ग किल्ला उभा आहे. हा प्राचीन किल्ला मजबूत बेसॉल्ट खडकावर बांधलेला आहे. हा किल्ला सुमारे दीड मैल परिसरात विस्तारलेला आहे. त्याच्या भक्कम तटबंदी आणि बुरुजांवरून याचे प्राचीन लढायांमधील महत्त्व स्पष्ट होते.
२. परांडा किल्ला: परांडा किल्ल्याचा इतिहास अत्यंत रोचक आहे. मुघल, निजामशाही आणि आदिलशाही अशा वेगवेगळ्या राजवटींमध्ये हस्तांतरित होत राहिलेला हा किल्ला काळाच्या ओघात या प्रदेशाच्या राजकीय घडामोडी आणि सैन्य रणनीतीचे प्रतीक बनत राहिला. - लेण्या
धाराशीव लेण्या: बालाघाट पर्वताच्या कुशीत लपलेल्या या प्राचीन लेण्या गंधर्व काळातील शिल्पकला आणि कोरीवकामाने सुशोभित आहेत. या जागेत कधी काळी मानवी वस्ती होती, याचे हे साक्षीदार आहेत. इतिहासप्रेमींना आणि पुरातन वास्तूंचे प्रेमी असलेल्या प्रवाशांना या लेण्या विशेष आनंद देतील.
हे सर्व ठिकाणे तुमच्या प्रवासाला ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याची अनुभूती देतात, ज्यामुळे तुमचा धाराशीव दौरा अधिक संस्मरणीय ठरेल.
भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ
धाराशीवला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम कालावधी आहे. या महिन्यांत हवामान आल्हाददायक आणि थंड असते, जे येथील ऐतिहासिक स्थळे, निसर्गसौंदर्य आणि संस्कृती अनुभवण्यासाठी उत्तम ठरते.
हंगामानुसार हवामान आणि उपक्रम
हंगाम | महिने | हवामान | प्रमुख आकर्षणे आणि उपक्रम |
पावसाळा | जून ते सप्टेंबर | हिरवाईयुक्त, मुसळधार पाऊस | निसर्गरम्य दृश्ये, परंतु जोरदार पावसामुळे बाहेरील उपक्रम मर्यादित. |
हिवाळा | ऑक्टोबर ते मार्च | आल्हाददायक, थंड व कोरडे | ट्रेकिंग, पर्यटन, छायाचित्रण, स्थानिक बाजारपेठांची सफर आणि सुंदर निसर्गदृश्यांचा आनंद. |
जर तुम्हाला स्थानिक सणांचा आनंद घ्यायचा असेल, तर गणेश चतुर्थी किंवा दसऱ्याच्या सुमारास धाराशीवला भेट द्या. या सणांदरम्यान शहराचे सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रम, आणि सणासुदीचे खास पदार्थ खाण्याची देखील संधी तुम्हाला मिळेल.
धाराशीव जिल्ह्याला का भेट द्यावी?
धाराशीव हे एक अप्रतिम आणि कमी परिचित ठिकाण आहे. इतिहासाचा ठेवा, मनमोहक निसर्ग, समृद्ध संस्कृती आणि चविष्ट खाद्यपदार्थ यामुळे हे ठिकाण प्रत्येकासाठी खास आहे.
प्राचीन लेण्या, भव्य किल्ले फिरताना याच्या वारशाचा अनमोल ठेवा आणि गजबजलेले बाजार फिरताना तुम्हाला येथील लोकांची आपुलकी अनुभवता येईल. येथील नैसर्गिक सौंदर्य आणि पारंपरिकतेची सहजता धाराशीवला इतर ठिकाणांपेक्षा वेगळे आणि अविस्मरणीय बनवते. त्यामुळे तुमच्या प्रवासाच्या यादीत धाराशिवचे नाव नक्कीच ठेवा.
Travel Essentials
Here are the travel essentials one should know
Top Attractions
Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Tulja Bhavani Temple
Pay homage at this revered Hindu temple dedicated to Goddess Bhavani, known for its intricate architecture and spiritual significance.

Naldurg Fort
Explore the majestic Naldurg Fort, an ancient fortress steeped in history and offering panoramic views of the surrounding landscape.

Dharashiv Caves
Discover the ancient rock-cut Dharashiv Caves, adorned with intricate carvings and sculptures, showcasing the region's rich cultural heritage.

Siddheshwar Temple
Visit the Siddheshwar Temple, a prominent pilgrimage site dedicated to Lord Shiva, known for its peaceful ambiance and religious fervor.

Bhuleshwar Temple
Experience tranquility at the Bhuleshwar Temple, nestled amidst lush greenery and offering a serene retreat for devotees and nature lovers alike.

Saraswati Temple, Washi
Seek blessings at the Saraswati Temple in Washi, known for its serene surroundings and religious significance among devotees.

Paranda Fort
In 1599, Mughals defeated Nizam Shahi of Ahmednagar. Though Emperor Akbar appointed his officers to look after the kingdom of the Deccan, the Nizam Shah’s officers refused to receive orders from them. They had lost their independence. They declared Murtaza, the son of Shah Ali king and made Paranda Fort, about 75 miles south east of Ahmednagar capital.

Ter (Tagar)
22 kms from Osmanabad At the distance of tere villages, ancient civilizations have become clear even today. The ancient region of Terai, known for its regional trade, is known by the name of the famous national saint Gorobakka Kumbhar. The village is old in this village and its temple is on the banks of the River Titanas.