छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ओळख

छत्रपती संभाजीनगर जिल्हा, पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखला जात असे, हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून समृद्ध असलेला महत्त्वाचा जिल्हा आहे. अजंठा आणि वेरूळ येथील प्राचीन लेण्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहेत आणि त्यामुळे हा जिल्हा इतिहासप्रेमी व पर्यटकांसाठी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे.

हा जिल्हा गोदावरी आणि तापी नदीच्या खोऱ्यांमध्ये विस्तारित असून त्याची भौगोलिक परिस्थिती खूपच वैविध्यपूर्ण आहे. डोंगराळ प्रदेश, विस्तीर्ण पठारं, मर्यादित जंगल क्षेत्र, आणि मान्सूनवर अवलंबून असलेले हवामान यामुळे या भागाला नैसर्गिक विविधता प्राप्त झाली आहे. भारताच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या जिल्ह्याने अनेक राजवंश, व्यापारी आणि प्रशासकीय केंद्र म्हणून भूमिका बजावली आहे.

हा जिल्हा पर्यटनासाठी आदर्श असून येथे प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य आणि आध्यात्मिक स्थळे यांचा समावेश आहे. इतिहासप्रेमी, निसर्गप्रेमी, किंवा धार्मिक प्रवासाची आवड असणाऱ्या पर्यटकांसाठी हा एक संस्मरणीय अनुभव देणारा जिल्हा आहे.

छत्रपती संभाजीनगरचा इतिहास

छत्रपती संभाजीनगर जिल्हा शतकानुशतके विविध संस्कृती आणि जीवनशैलींच्या संगमाचे ठिकाण राहिले आहे. या भागाने व्यापार, संस्कृती आणि प्रशासनाचे केंद्र म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत अनेक राजवटींचा उदय आणि अस्त पाहिला आहे.

सातवाहनांनी प्रतिष्ठानला (आजचे पैठण) आपली राजधानी बनवली. या कालखंडात पैठण हा सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घडामोडींचा केंद्रबिंदू बनले. सातवाहनांनी त्या काळात ग्रीक बाजारपेठांवर वर्चस्व गाजवले. विशेषतः प्रसिद्ध पैठणी रेशमी साड्या, मसाले आणि हस्तिदंताच्या वस्तूंच्या व्यापारात ते अग्रेसर होते.

सातवाहनांनी सुरू केलेल्या प्राचीन व्यापार मार्गांवर वसलेल्या या भागाने पाटलीपुत्र, तक्षशिला, अवंती यांसारख्या भूप्रदेशीय व्यापार केंद्रांना बंदरे व किनाऱ्यांशी जोडले. या मार्गामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण आणि आर्थिक भरभराट झाली.

यानंतर, जैन आणि ब्राह्मणकालीन लेण्यांची निर्मिती झाली ज्यातून या भागातील समावेशकता आणि धार्मिक विविधतेची झलक दिसते. वेरूळची लेणी याचे उत्तम उदाहरण आहे, जिथे बौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या स्मारकांचा मिलाफ पहायला मिळतो.

नंतरच्या काळात वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, आणि यादव राजवंशांनी या प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशात मोठे योगदान दिले. जवळपास पंधरा शतकांपर्यंत वेगवेगळ्या राजवंशांनी येथे राज्य केले. पुढील काळात वाकाटक,चालुक्य,राष्ट्रकूट आणि यादव यांसारख्या राजवटींचा उदय झाला. या सगळ्यांनी जिल्ह्याच्या सांस्कृतिक आणि स्थापत्य वारशात महत्त्वाची भर घातली. १३व्या शतकाच्या उत्तरार्धात मुस्लिम राजवटींचा उदय झाला आणि पंधराव्या शतकांपर्यंत जिल्ह्याच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक रचनेला आकार दिला.

आधुनिक इतिहासात,या जिल्ह्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्या सन्मानार्थ आपले नाव बदलून आपला मराठा वारसा पुन्हा जिवंत केला आहे. पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचे हे नामकरण, अँपूर्ण महाराष्ट्राला गर्व असणाऱ्या संभाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे महत्व अधोरेखीत करते.

छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटन स्थळे

छत्रपती संभाजीनगरचा प्रवास करताना तुम्हाला प्रवासाचा आनंद देणारी अनेक ठिकाणे पाहायला मिळतात. खालील काही ठिकाणे तुम्हाला नक्कीच आवडतील:

  • धार्मिक स्थळे
    १. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर – भगवान शंकराला समर्पित हे मंदिर भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असून श्रद्धाळूंसाठी महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे.
    २. साईबाबा मंदिर, शिर्डी – छत्रपती संभाजीनगरजवळील शिर्डी हे साईबाबांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून जगभरातील भाविक येथे त्यांच्या दर्शनासाठी येतात.
  • निसर्गरम्य स्थळे
    १. लोणार सरोवर – ५०,००० वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेले हे सरोवर वैज्ञानिक आणि निसर्गप्रेमींसाठी एक अद्वितीय आकर्षण आहे.
    २. जायकवडी धरण – गोदावरी नदीवरील हे भव्य धरण शांत विश्रांतीसाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आहे. येथे हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन होते. या महिन्यांमध्ये धरणावर सकाळी आणि संध्याकाळी कोवळ्या उन्हात तुम्ही पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता.
  • किल्ले
    १. दौलताबाद किल्ला: “अभेद्य किल्ला” म्हणून ओळखला जाणारा हा डोंगरमाथ्यावरील किल्ला एकेकाळी मध्ययुगीन भारताची राजधानी होता. उत्कृष्ट रक्षणयोजना आणि पुरातन लष्करी तंत्रज्ञानाची झलक देणारा हा किल्ला तुम्हाला सुंदर निसर्गासोबतच एक अद्वितीय ऐतिहासिक अनुभव देईल.
  • लेण्या
    १. अजिंठा लेणी: इ.स.पू. दुसऱ्या शतकातील अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखली जातात. येथील अप्रतिम भित्तीचित्रे आणि शिल्पकला प्राचीन भारतीय कलावैभवाचे प्रतीक आहेत.
    २. वेरूळ लेणी: येथील आणखी एक जागतिक वारसा स्थळ म्हणजे वेरूळ लेणी! बौद्ध,जैन आणि हिंदू प्रभाव दाखवणारी उत्कृष्ट शिल्पकलेची उदाहरणे येथे आहेत. यातील खास वैशिष्ट्य म्हणजे कैलास मंदिर! जे एका अखंड दगडात कोरलेले असून स्थापत्य कौशल्याचे अद्वितीय उदाहरण आहे.
    ३. पितळखोरा लेणी: या प्राचीन लेणी या भागातील सर्वात जुनी असून बौद्ध स्थापत्यकला आणि शिल्पकलेचे दर्शन घडवतात. हिरवळीने भरलेल्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या या लेण्यांमध्ये शांतता आणि नयनरम्य सौंदर्य अनुभवता येते.
  • अन्य आकर्षणे
    १. बीबी का मकबरा: “दख्खनचा ताजमहाल” म्हणून ओळखले जाणारे हे भव्य स्मारक मुघलकालीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजम शाहाने आपली आई दिलरस बानो बेगम यांच्या स्मरणार्थ हे बांधले. प्रेम आणि मुघल स्थापत्यकलेचे प्रतीक असलेल्या या स्मारकाभोवती सुंदर बागा आणि कारंजे आहेत. इतिहास आणि वास्तुकलेत रस असणाऱ्यांसाठी हे ठिकाण आवर्जून भेट देण्यासारखे आहे.
    २. सोनेरी महाल: राजपूत शैलीतील हा आकर्षक महाल आता संग्रहालयात रूपांतरित करण्यात आला आहे. येथे प्राचीन वस्तू, चित्रे, आणि ऐतिहासिक प्रदर्शन पाहायला मिळते. त्याचे सुवर्ण छटा असलेले सौंदर्य वास्तुकलेची आवड असणाऱ्यांना मोहून टाकते.

या सर्व स्थळांना भेट देताना भरपूर वेळ काढुन, गाईड अथवा स्थानिक लोकांशी मनमोकळा संवाद साधून अधिकाधिक माहिती घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपन्नतेचा आनंद घ्या.

भेट देण्यासाठी उत्तम काळ

हिवाळ्याच्या महिन्यांत (ऑक्टोबर ते फेब्रुवारी) या शहराला भेट देणे सर्वात उत्तम मानले जाते.

महिना हवामान प्रमुख आकर्षण
ऑक्टोबर आल्हाददायक, मध्यम तापमान सण, उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम
नोव्हेंबर थंडगार व सुखद हवा पर्यटन, ऐतिहासिक स्थळे, मैदानी उपक्रम
डिसेंबर गारठा असलेले पण आल्हाददायक स्थानिक संस्कृतीचा अनुभव, उत्सवमय वातावरण
जानेवारी-फेब्रुवारी थंड आणि आल्हाददायक ऐतिहासिक व खाद्यसंस्कृतीचा आनंद, पर्यटनासाठी सर्वोत्तम काळ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला का भेट द्यावी?

छत्रपती संभाजीनगर हा संस्कृती, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम आहे. अनेक राजवंश, व्यापारी मार्ग, आणि विविध संस्कृतींचा वारसा जपणारा हा जिल्हा भारताच्या ऐतिहासिक कथेत महत्त्वाची भूमिका बजावतो.

जर तुम्हाला जर ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे किंवा धार्मिक ठिकाणे आवडत असतील तर छत्रपती संभाजीनगर तुमच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमध्ये असायलाच हवे. येथील स्थानिकांची आत्मीयता, प्राचीन वारसा आणि थक्क करणारं निसर्गसौंदर्य तुम्हाला इथे वारंवार येण्यास प्रवृत्त करेल.

Travel Essentials

Here are the travel essentials one should know

Weather

28 - 41°C

Ideal Duration

3 - 5 days

Best Time

October to March

Top Attractions

Discover the beauty and culture of Maharashtra through our curated experiences

Ajanta Caves

Ancient Buddhist rock-cut caves famous for exquisite frescoes and sculptures, a UNESCO World Heritage Site.

Ellora Caves

A remarkable blend of Buddhist, Hindu, and Jain monuments carved from rock, also a UNESCO World Heritage Site.

Grishneshwar Temple

One of the revered 12 Jyotirlinga sites, celebrated for its spiritual and architectural significance.

Panchakki

A 17th-century water mill displaying historical engineering skills.

Soneri Mahal

A 17th-century palace famous for its ornate golden paintings.

How to Reach

By Air

Aurangabad Airport, also known as Chikkalthana Airport, is the primary airport serving the city. It is well-connected to major cities like Mumbai, Delhi, Hyderabad, and Pune. From the airport, you can hire a taxi or use public transportation to reach the city center.

By Train

Aurangabad Railway Station is a major railway station on the South Central Railway network. It is well-connected to cities like Mumbai, Pune, Delhi, Hyderabad, and Nagpur. Several express and passenger trains operate on these routes, providing convenient access to Aurangabad.

By Road

Aurangabad is well-connected by road to major cities like Mumbai, Pune, Nashik, and Nagpur. National Highway 211 passes through Aurangabad, making it easily accessible by car or bus. State transport buses and private taxis are available for travel to and from Aurangabad.
Scroll to Top